Saturday, December 25, 2021
भारत जमीन का टुकडा नहीं,जीता जागता राष्ट्रपुरुष है।
Tuesday, December 14, 2021
संगीतम् परमानंददायकम्..
Monday, December 13, 2021
भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ।। 🚩🚩
वेदांच्या अखेरच्या रचनेतील भगवद्गीता हा एक प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला गेला आहे. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, यांचे मार्गदर्शन करतो. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हटले गेले आहे आणि आजच्या एकादशीला 'मोक्षदा एकादशी' म्हंटले आहे. महाभारतातल्या भीष्म पर्वा मध्ये गीतेचा उल्लेख आढळतो. गीतेत एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. हा एक पवित्र धर्मग्रंथ आहे आणि जगात एकमेवाद्वितीय ग्रंथ असावा ज्याची जयंती साजरी केली जाते. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली. विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायिली' जाते. लिहिण्याची साधने उपलब्ध नव्हती तेव्हापासून हिंदू धर्मातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देण्याची प्रथा आहे आणि म्हणून संथा रुपात गीता सांगितली जाते. जगातील विविध देशांतले व विविध धर्मातले असंख्य तत्त्ववेत्ते,शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत. आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे म्हणून गीता ही शाश्वत आहे.
श्रीवेदव्यासांनी महाभारतात गीतेचे वर्णन करून झाल्यावर म्हटले आहे -
गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिःसृता ॥
गीता सुगीता करण्याजोगी आहे. म्हणजेच गीता उत्तम प्रकारे वाचून
तिचा अर्थ आणि भाव अंत:करणात साठवणे हे मुख्य कर्तव्य आहे. कारण ती स्वतः पद्मनाभ भगवान् श्रीविष्णूंच्या मुखकमलातून प्रगट झाली आहे.
कोणत्याही वर्णाच्या व आश्रमाच्या प्रत्येक माणसाला गीताशास्त्र
अभ्यासण्याचा अधिकार आहे. मात्र त्याची भगवंतांच्या ठिकाणी भक्ती व श्रद्धा अवश्य असली पाहिजे. कारण स्वतः भगवंतांनी आपल्या भक्तांमध्येच याचा प्रचार-प्रसार करण्याची आज्ञा दिली आहे. गीतेबद्दल कायमच वेगळेपण जाणवते आणि आज मोक्षदा एकादशी निमित्ताने ह्यावर लिहिताना वेगळ्याच भावना आहे.खरंतर भक्ती योगात भगवंताने वेगळं काय सांगितलं आहे.
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि...
तत्कुरुष्व मदर्पणम्।।
म्हणजेच तू जे काही काम करशील. ते तू मला अर्पण करून टाक. म्हणजेच थोडक्यात त्याचं कर्तृत्व सोडून दे... कुणीतरी पाठिशी आहे म्हणून तू पुढे आहेस,हे लक्षात ठेव आणि ह्याच गीता तत्त्वावर प्रत्येकाची वाटचाल दृढ व्हावी हीच गीता जयंती निमित्ताने श्री भगवंताचरणी प्रार्थना आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#गीता_जयंती #मोक्षदा_एकादशी