Friday, December 25, 2020
भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ।। 🚩🚩
Thursday, December 24, 2020
स्मरण एका अक्षर योग्याचे !!
टाईमलाईनवर पोस्ट बघितली आणि क्षणात मन काहीकाळ भूतकाळात रमले. नानांचा आणि आमच्या कुटुंबाचा ऋणानुबंध शब्दांत व्यक्त करणे तसे शक्य नाहीच पण नानांचा परिचय आणि कार्याची ओळख व्हावी ह्या हेतूने हे लेखन आहे.
Tuesday, December 22, 2020
‘लॅाकडाउनमधला माझा सोबती’
पुस्तकाचे शीर्षक वाचूनच हे पुस्तक एका बैठकीत वाचुन संपवले. सोशल मीडिया तज्ञ अजित पारसे ह्यांनी फक्त ४२ पानांत लॅाकडाउनमध्ये सोशल मीडियाच्या सकारात्मक वापरावर प्रकाश टाकणारं पुस्तक लिहिले आहे. बहुदा अशाप्रकारचे हे पहिलेच पुस्तक असावे. साधारणपणे २०-२५ मिनिटांत सहज वाचून संपेल असे छोटेसे पण मार्गदर्शक आणि ह्याच माध्यमाची नव्याने ओळख व्हावी ह्या शुध्द हेतूने त्यांनी लिहिले आहे. कोरोना महामारीने संपूर्ण जग हादरून गेलं आहे. या महामारीच्या वेदना असह्य होत्या आणि काही प्रमाणात आजही आहेत. या वेदना कमी करण्यासाठी शक्य त्या परीने अनेकांनी प्रयत्न केलेत. या संकटात लॅाकडाउनमध्ये घरी एकटे पडलेल्या नागरिकांना सोशल मीडियाची मोठी साथ मिळाली. खरंतर सोशल मीडिया हे मानवी मनाला आनंद देणारे प्रभावी माध्यम म्हणून एक अविभाज्य घटक बनले आहे.
मुळात माणूस हा समाजशील प्राणी आहे, असं आपण जेव्हा म्हणतो. तेव्हा प्रत्येक काळामध्ये किंवा संस्कृतीमध्ये त्याच्या या समाजशीलतेचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला हमखास दिसून येतं. अर्थात काळानुरूप जे काही सामाजिक, आर्थिक बदल होत गेले, त्यानुसार माणसाच्या संस्कृतीही बदलत गेल्या आहेत आणि आज कोरोनामुळे टाळेबंदीच्या काळात सोशल मीडिया मुळे जगाच्या या टोकावरील व्यक्ती दुसर्या टोकावरील व्यक्तीशी क्षणात सवांद साधू शकत होती. सर्वात वेगवान प्रसिद्धीसाठी अथवा अभीव्यक्तीसाठी इतकं अप्रतिम व्यासपीठ यापूर्वी कधीच उपलब्ध नव्हतं आणि आम्ही ह्या माध्यमाची सकारात्मकता ही टाळेबंदीच्या काळात टिकवून ठेवली होती त्यामुळे जेव्हा जेव्हा कोरोनाची चर्चा होईल तेव्हा सोशल मीडिया ची सकारात्मकता ही चर्चेत येईलच.
सध्याच्या काळात संवाद आणि भावनांचं आदान प्रदान करण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे मोठ्या आशेनं बघितलं जातं. त्याचा आपण जसा वापर करू, तशाचप्रकारे त्याची फळे आपल्याला मिळणार आहे. जगभरात कोरोनाची महामारी आणि लॉकडाउनचा काळ, सर्वांसाठीच असह्य होता. त्यामुळेच लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियाचा सकारात्मक वापर कसा झाला? त्याचा समाजाला कसा फायदा झाला आणि भविष्यात अशा मोठ्या संकटांना सामोरे जाताना, या सोशल मीडियाचा वैयक्तिक आणि सरकारी पातळीवर धोरण म्हणून कसा वापर करता येईल ? याचा विचार होणे गरजेचे होते. जगाने अनुभवलेल्या या महामारीत सोशल मीडियाची सकारात्मक बाजू वाचकांसमोर मांडण्याचा उत्तम प्रयत्न लेखकाने केला आहे. ह्या पुस्तकाची अनुक्रमणिका वाचूनच पुस्तक कसे प्रभावी आहे ह्याची कल्पना येते. प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करत एका बैठकीत वाचून संपेल अशीच पुस्तकाची मांडणी लेखकाने केलेली जाणवते आहे.
आज हे पुस्तक निःशुल्क उपलब्ध झाले आहे. संवादक्षेत्रात क्रांती करणाऱ्या समाज माध्यमाची सकारात्मक बाजू लोकांपर्यंत पोहोचावी आणि पर्यायी त्याचा फायदा समाजाला आणि लोकांना व्हावा ह्या शुद्ध हेतूने लेखकाने हे पुस्तक निःशुल्क उपलब्ध केले आहे. आपल्याला हे पुस्तक हवे असल्यास आपण कमेंट बॉक्स मध्ये मेल आयडी द्यावा. लेखक स्वतः ई बुक आपल्या मेल आयडीवर पाठवतील.
✍️ सर्वेश फडणवीस
Monday, December 14, 2020
लायब्ररी ऑन व्हील्स !! 🚗📚📖
बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ॥
Monday, December 7, 2020
सशस्त्र सेना झेंडा दिवस..🇮🇳
Friday, December 4, 2020
योगी श्रीअरविंद !!
Sunday, November 29, 2020
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिक मासी !! 🌿
Friday, November 6, 2020
भारताच्या इतिहासातील गौरवशाली सुवर्णकाळ - टाटायन
Saturday, October 31, 2020
" स्टॅच्यू ऑफ युनिटी " चे शिल्पकार ..
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा साकारणारे हात मराठी माणसाचे आहेत. लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांचा पुतळा साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार आहेत राम सुतार. आम्ही भारतीयांनी मनाशी पक्के ठरवले तर आम्ही जगही जिंकू शकतो ह्याची प्रचिती आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघतांना सहज येईल. भव्यदिव्य आणि विराट असा पुतळा साकारण्यात आमचे कारागीर नक्कीच कौतुकास पात्र आहे.
गुजरातच्या नर्मदा नदीकिनारी सरदार सरोवर प्रकल्पाजवळ बांधण्यात आलेला १८२ मीटर उंचीचा हा पुतळा चीनमधील बुद्ध प्रतिमेपेक्षाही उंच आहे. या महाकाय पुतळ्याला साकारण्यामागची मेहनत आहे, ती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांची. नोएडामध्ये असलेल्या विशाल स्टुडिओत वयाच्या ९५ व्या वर्षीही ते कलेशी आजही एकरूप आहेत. इतिहासातील, पुराणातील विविध व्यक्तिमत्वांच्या प्रतिमा साकारण्यासाठी ते ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराज,झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी,नेहरू,पं.दीनदयाल उपाध्याय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा अनेक प्रतिमा साकारणार्या राम सुतार यांच्या नावे जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्याचा विक्रमही वयाच्या ह्या टप्प्यावर नोंदवला गेला आहे. ते मराठी असल्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असेच त्यांचे कार्य आणि कर्तृत्व आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या कामाची सुरुवात २०१३ मध्ये सुरू झाली होती. यावेळी त्यांच्यासह १०० जणांचे पथक काम करत होते. १८२ मीटर उंच इतक्या प्रचंड मूर्तीची घडवणूक करताना त्यातील बारकाव्यांकडे राम सुतार यांचे बारीक लक्ष असे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा बघतांना सुद्धा ते दिसून येते. शिल्पातील डोळे, खांदे, पाय आदींतून मनुष्याच्या प्रतिमेची ठेवण यांची हुबेहूब प्रतिमा साकारण्याची कला सुतार यांनी जोपासल्यामुळेच शिल्पांमध्ये जीवंतपणा आलेला दिसतो. सरदार पटेल यांच्या शिल्पाचा चेहरा ७० फूट उंच, डोळ्यांची बुबुळे दीड मीटर रूंद,१४० फूट रूंद खांदे आणि ८० फूट रूंद असलेली पादत्राणे ही दुरुनही स्पष्ट दिसतात. शिल्प साकारताना त्यात जीव ओतणार्या या कलेच्या महापुरुषाचा गौरव आज सातासमुद्रापार पोहोचला आहे. केंद्र सरकारने २०१६ साली पद्मभूषण किताब देवून गौरविले आहे आणि दरवर्षी ३१ ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने सरदार पटेलांचे स्मरण करतांना हे ऐतिहासिक शिल्प प्रत्यक्ष कृतीतून साकार करणाऱ्या राम सुतार ह्यांना स्मरणात ठेवावं लागणार आहेच.
✍️ सर्वेश फडणवीस
#StatueOfUnity #RashtriyaEktaDiwas #31october
Thursday, October 29, 2020
कोजागिरी पौर्णिमा 🌕✨
Friday, October 23, 2020
आदीमाय तु तुझीच माया । पसरे या भुवनी..🙏🌺🙏
Thursday, October 22, 2020
जागर स्त्री शक्तीचा 🌟 🙌🙏
Thursday, October 15, 2020
" रोबोटिक हात " निर्माण करणारे प्रशांत गाडे !!
वाचन प्रेरणा दिवस निमित्ताने...प्रभावी वाचनाच्या सवयी !!
Monday, October 12, 2020
आदिवासींचे आशास्थान डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे
Thursday, October 8, 2020
चिखलगावच्या लोकसाधनेचे कल्पवृक्ष -डॉ राजा आणि रेणू दांडेकर
Monday, October 5, 2020
नर्मदालयाच्या शिक्षणव्रती - भारती ठाकूर
Thursday, October 1, 2020
काश्मीरशी "असीम" मैत्री करणारे सारंग गोसावी !!
Monday, September 28, 2020
भिक्षेकऱ्यांना सन्मान मिळवून देणारे - डॉ.अभिजित सोनावणे
Saturday, September 26, 2020
टेलीफोनचे आत्मकथन … ☎️
नमस्कार मंडळी. हल्ली कोरोनामुळे आपण सगळेजण घरातच आहोत. तसा मी तर कायमच घरात असतो. पण ह्या लॉकडाऊन मुळे माझा वापर ही वाढला आणि अनेक दिवसांपासून आपल्याशी मनातलं काही बोलायची इच्छा होती. आज शनिवार आणि सुट्टीचा दिवस. आज माझ्या प्रवासाबद्दल खरंतर काही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कदाचित आवडेल ही कारण आता मी हळूहळू कालबाह्य होतो आहे. माझं अस्तित्व संपण्यातच जमा झाले आहे. पण तरीही अनेकांच्या दिवाणखान्यात आजही माझ्यासाठी एक कोपरा,कुणाकडे टेबलवर कुणाकडे भिंतीवर,फ्रिजवर माझ्यासाठी जागा आहेच. आधी माझा जन्म झाला माझ्यानंतर कॉडलेस फोन आला त्यानंतर पेजर आला त्यानंतर मोबाईल आला आणि आता स्मार्टफोन आहे. माझी जडणघडण ही तुमच्यामुळे झाली. तुम्ही नवनवीन प्रयोग करत गेलात आणि मी घडत गेलो. तसं म्हंटल तर आज माझी चौथी पिढी आता तुमच्याजवळ आली आहे.
Mr. Watson! Come here, I want to see you.’’ १८ मार्च १८७६ रोजी उच्चारलेले हे वाक्य जगाच्या इतिहासात अमर झाले, कारण ते वाक्य बोलणारे शास्त्रज्ञ होते- अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल आणि ऐकणारे शास्त्रज्ञ होते- बेलचे सहकारी थॉमस वॅटसन. दोघेही बाजूबाजूच्या खोलीत बसले होते. पण हा संवाद झाला तो बेल यांनी तयार केलेल्या दूरध्वनी यंत्रावर. दूरध्वनी यंत्राची चाचणी घेण्यासाठी बोललेले आणि पलीकडे ऐकू गेलेले हे पहिले वाक्य होते. पत्र्याच्या दोन डब्यांना तारेने जोडून एका डबीतून बोललेले पलीकडे ऐकण्याचा खेळ आपण लहानपणी खेळला आहे आणि विज्ञानाच्या पुस्तकांतही वाचला आहे.
सामान्यत: ध्वनिलहरी हवेतून प्रवास करतात. ऐकणाऱ्याच्या कानावर आपटतात. कानातील पडदा त्या लहरींमुळे थरथरतो. त्यामुळे आतील यंत्रणा कार्यान्वित होते. मेंदूला योग्य तो संदेश जातो आणि ऐकणारा ध्वनी ऐकतो. जर ध्वनीचे उगमस्थान ऐकू येण्याच्या कक्षेत असेल तरच ही प्रक्रिया पूर्ण होते. पण जेव्हा हे अंतर काही मीटर किंवा दोन पूर्ण वेगळ्या भौगोलिक स्थानापर्यंत वाढते तेव्हा तयार होणाऱ्या ध्वनिलहरी दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी यंत्रणेची आवश्यकता असते.
माझा शोध लागण्यापूर्वी १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासून तारायंत्रे (Telegraph) वापरात आली. आदिम काळापासून धूर अथवा अग्नीच्या साहाय्याने सांकेतिक संदेश देण्याची परंपराच नवीन विद्युत् तंत्रज्ञानाच्या आधारे दूर संदेशवहनाच्या कामी येऊ लागली. इ. स. १७६८ पासून या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. प्रत्येक अक्षरासाठी एक तार वापरण्यापासून ते काही संकेत तयार करून, ते विद्युत् तारांमार्फत पाठवले जाऊ लागले. यातूनच १८३७ मध्ये सॅम्युअल मोर्सने एक सांकेतिक लिपी तयार केली; जी तारायंत्राच्या ‘डा’ आणि ‘डिट’ या दोन आवाजांत बांधली गेली होती. त्या भाषेला ‘मोर्स कोड’ म्हणतात. अगदी आत्तापर्यंत जलद संदेशवहनाकरता तारा पाठवण्याची पद्धत चालू होती.
पूर्वीच्या काळातील फोनच्या तबकडीवरील हवे ते आकडे फिरवून तयार होणारे स्पंद दूरध्वनी केंद्राकडे पोहोचत असत. (या पद्धतीला pulse dialing म्हणतात.) आधुनिक दूरध्वनी संचामध्ये आपण आकडे लिहिलेली बटणे दाबून हवा तो आकडा केंद्राकडे पोहोचवतो. बटन दाबल्यावर तयार होणारा आवाज केंद्राकडे पोहोचतो आणि आपल्याला हवा तो आकडा केंद्राला कळतो. (या पद्धतीला DTMF-dual-tone multi-frequency म्हणतात.)
हा आकडा कळल्यावर पूर्वी केंद्रात असलेले कर्मचारी त्या आकडय़ाच्या दूरध्वनी संचाशी संपर्क जोडून देत असत. आता हीच प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक तंत्र वापरून स्वयंचलित केलेली आहे. संपर्क साधल्यावर दोन्ही दूरध्वनी संच एकमेकांशी जोडले जातात आणि संवाद सुरू होतो. हळूहळू माझ्यात ही बदल होत गेले आणि संपर्क यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी आता धातूच्या तारेऐवजी काचेचे तंतू असलेल्या तारा (Fibre Optics) वापरतात. तसेच विद्युत् चुंबकीय लहरी उपयोगात आल्यापासून दोन संचांमध्ये थेट तारेमार्फत संपर्क न होता तो ‘संच-केंद्र-उपग्रह-केंद्र-संच’ अशा साखळीतून होतो.
खरं तर आता मोबाईल अर्थात भ्रमणध्वनी संच हा जणू आपला एक नवीन अवयवच असल्यासारखा वापरला जातोय आणि नुसते बोलणे आणि ऐकणे या मूळ क्रियांबरोबरच इतर बरेच नवनवीन प्रयोग करत आहात. सध्या ह्याची मागणी खूप असल्याने मी थोडा दुर्लक्षित झालो असेल पण अनेकांच्या घरी आजही मी आहे आणि ते प्रसंगी माझा वापर करतात. सर्वेशकडे सुद्धा मी १९९९-२००० च्या दरम्यान आलो आणि जवळपास २० हुन अधिक वर्ष झाली आणि त्यांच्यातला एक झालो आहे. दोन-तीनदा त्यांनी सुद्धा मला परत पाठवण्याची व्यवस्था केली होती पण इतकी वर्षांची सोबत असल्याने आमचे ऋणानुबंध टिकून आहेत आणि गुण्या-गोविंदाने आम्ही एकमेकांच्या सोबत आहे.
चला येतो मी. निघण्याची वेळ झाली. भेटू पुन्हा कधीतरी..
सर्वेश
#telephone